Sunday, January 9, 2011

''आम्ही तुडवलं भांडारकर''

                            ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला त्या घटनेचा मी एक साक्षीदार नव्हे घटनाकार ! होय,आम्हीच तुडवलं ५ जानेवारी  २००४ ला भांडारकर ! बहुजनप्रतिपालक छत्रपति शिवराय व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या अवमानाचा बद्दला आम्ही आमच्या पध्दतीने घेतला.हे सर्व का घडले ? कुणामुले घडले ? त्याच फलित काय ? अशा एक ना अनेक प्रश्नाची उत्तरे आता,आम्हाला सापडली आहेत.खरे तर,या अशा प्रश्नाशी आमचा काहीच संबंध नव्हता.कारण पंढरपुर तालुक्याचे माजी आमदार स्मृतिशेष कर्मवीर औदुंबरअण्णा पाटिल यांचा मी नातू.बहुदा हीच ओलख होती माझी.लहानपना पासून असलेली चित्रकारी ची आवड व ती जोपासण्यासाठी माझी सततची धडपड.एका संपन्न घराण्यात जन्माला आल्यामुले कशाचीच कालजी नव्हती.तरी पण अण्णानी स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या येवती या आमच्या मूळ गावातील डाकबंगला जळीत प्रकरणा संबंधी अभिमान वाटे आणि लहानपणा पासून एका नावाच जबरदस्त आकर्षण होते.ते नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटिल ! या नावाचे किंवा क्रांतिसिंहाच्या आयुष्यासंबंधी पहिल्या पासूनच कुतूहल होते.पण कधी सुद्धा वाचनाची आवड नव्हती.पण कदाचित नुसती कागदावर चित्रे काढून आयुष्य जाणार नव्हते.तर या बहुजन समाजाचे बिघडलेले चित्र दुरुस्त करण्याचे काम मला करावयाचे होते.हा विचार मनाला कधी शिवला सुद्धा नाही.हे सर्व सुरु असताना मी दाहवी नापास झालो.व त्यावेलेस शनी भक्ति कड़े वळलो,नुसता  वळलो नाही तर त्यात पार बुडून गेलो.साडेतिन वर्ष मनोभावे शनीभक्ति केली.पण एक दिवस मात्र आयुष्याला एक दिशा देणारी घटना घडली.ती म्हणजे घरा मध्ये मा.म.देशमुख नावाच्या इतिहासकाराची 'शिवशाही' व 'मराठा कुणबी समाजाची दशा व दिशा' ही पुस्तके येऊन पडली.सहज पुस्तके चाळली व पुस्तकातील भटजी-शेटजी-लाटजीची भाषा वाचली.आणि मनात आले,की किती जातीयवादी माणुस आहे.हा मा.म.देशमुख.पुन्हा आमची शनीभक्ति  सुरूच राहिली.पण विचारचक्रे मात्र पुन्हा फिरू लागली.त्याच वेळेस घरात मराठा सेवा संघाच्या ८ व्या अधिवेशनाची पत्रिका पाहिली.पत्रिकेत मा.म.देशमुख यांचे नाव होते.त्यांचे व्याख्यान होते.मग गडबडित अधिवेशनाचे ठिकान गाठले.आणि मा.म.देशमुख यांच्या पहिल्या वाक्यातच गारद झालो.तसा तडक घरी आलो.व वडिलाकडे पुस्तकांची  मागणी केली.त्यांनीपण भलामोठा गट्ठाच खरेदी करुन पुस्तके आणून दिली.आणि प्रवास सुरु झाला.संभाजी ब्रिगेडच्या दिशेने.....!
                       अधिवेशना मध्ये सौदागर मोळक व प्रशांत सुरवसे यांची ओळख झाली होती.गांधी रोडच्या तांबट धर्मशाळेत पहिली मिटिंग झाली.व संभाजी ब्रिगेडच्या पाच शाखा उघडण्याचे ठरले.पण १ जानेवारी १९९९ ला प्रत्यक्ष तीनच शाखा स्थापन झाल्या.एक नंबर नाथ चौक येथे व दोन इतर ठिकाणी.एवढे सगले होउनही शनीभक्ति अखंड सुरु राहिली.आयुष्यातिल पहील भाषण अर्ध्या मिनटाचे,दुसरे  भाषण एक मिनटाचे व तीसरे भाषण पाच तासाचे.त्याच दरम्यान शनीला जात असताना सुरेश गणेशकर साहेबांची ओळख झाली.व सतत चर्चा,विचार,वाचन सुरु  झाले.त्यातच शनी अमावसेला शनीशिगनापुरला गेलो.तिथल्या घराना दारं,खिडक्या नसल्याचे पाहून व तिथे चोरी होत नाही असे ऐकून मन प्रसन्न झाले.पण इकडे मा.म.देशमुखांच्या पुस्तकाचा फडशा पडत होता.व एक दिवस त्यातच प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा असे वाचनात आले.व चिकित्सा सुरु झाली.मांजर आडव जाते त्याची,शनिवारी दाढ़ी कटिंग न करण्याची.त्यातच पुन्हा शनीशिगनापुरला गेलो.पण या वेळेला सोबत चिकित्सा घेउन गेलो.आणि तेथे गेल्यावर तिथली हरामखोरी पाहून थक्कच झालो.संपूर्ण शनीशिगनापुरात दारे नाहीत.खिडक्या नाहीत.कुलुप घालणे अशुभ.अशा शनीशिगनापुरात शनीच्या दक्षिणा पेटिला भले मोठे कुलुप.तेव्हाच शनीची लायकी कळली.म्हणजे आमच्या बहुजनाची संपत्ति विना दारं-खिडक्यांची वार्र्यावर व भटा-ब्राह्मनांचे हितसंबंध  मात्र कुलुपात.वारे शनी..!तसा तडक घरी आलो व शनीचा फोटो पालथा घातला.
                      संभाजी ब्रिगेड मध्ये मी आणि माझ्यात संभाजी ब्रिगेड केव्हाच एकरूप झाली होती.कार्यकर्ता,शहर उपाध्यक्ष,शहर व तालुका  अध्यक्ष एकचवेळी व आता तालुका अध्यक्ष.या जबाबदार्या पार पडल्या व अद्यापही पार पाडत आहे.पंढरपुर शहर व तालुक्याचा प्रवास आता एका वेगळ्या दिशेने सुरु झाला आहे.मला माहित नाही माझी यात काय भूमिका आहे ? पण एक मात्र नक्की हा विचार बहुजन समाजाला तारनारा विचार आहे.माझ्या आयुष्यातिल महत्वाची घटना म्हणजे भांडारकर प्रकरण....!
                        राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना  प्ररेणास्थान मानून जगामध्ये एका नवीन धर्माचा उदय होत आहे.तो म्हणजे शिवधर्म ! १२ जानेवारी २००५ रोजी कोट्यावधी बहुजन समाज हिंदू धर्माचा त्याग करुन शिवधर्माची दीक्षा घेणार आहे.म्हणजेच देशाच्या सांस्कृतिक,धार्मिक इतिहासात एका नव्या क्रांतिला सुरवात होत आहे.आणि मी त्या क्रांतिचा एक सच्चा वारसदार आहे.पण या देशातील सडक्या मेंदूच्या समाजातून शिवधर्म जननी जिजाऊंचीच बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले ! एप्रिल-मे २००३ मध्ये जेम्स लेन लिखित 'शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.साप्ता.चित्रलेखा मध्ये त्यातील तो वादग्रस्त मजकुर वाचण्यात आला.मी त्वरित संभाजी ब्रिगेडच्या वार्षिक सभेमध्ये पुस्तकांचा निषेध नोंदवला व पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणारे पाच हजार निवेदन पत्र मुख्यमंत्री व ग्रहमंत्री यांना पाठवण्यात आली.तरी पण कृति शुन्य ! मग मात्र एक दिवस ठोस पाऊल उचलन्याचे ठरले.त्याप्रमाणे मी,किरण आटकले,संदीप जाधव,पिंटू आटकले,शिवाजी चव्हाण,रमेश कदम,दत्ता ताड,सचिन कोले इत्यादी ४ जानेवारी २००४ ला रात्री   पंढरपुरातुन निघलो.ठरलेल्या ठिकाणी इतर सर्वजन जमन्या अगोदर आम्ही पोहचलो.रात्री १२ वाजल्या पासून पहाटे २ वाजे पर्यंत सर्वाना मी सुचना व माहिती दिली.सकाळी ६ वाजता ठिकान सोडले.आणि.....११ वाजून ५   मिटानी भटाचा भांडारकर अड्डा उदवस्त केला.
                          वादग्रस्त पुस्तक लिहले जेम्स लेनने आणि  कारवाई केली भांडारकरवर असे का ?या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ लागले.त्याला करणेही तशीच होती.मुलामध्ये या पुस्तकाचा लेखक जेम्स लेन हा पुण्यामध्ये बराच काळ राहिला होता.पुस्तक प्रकाशित झाल्या नंतर दै.सामना मधून अनंत देशपांडे यांनी पुस्तकाचे कौतुकपूर्ण परिक्षण लिहले होते.बाबा पुरंदरेने सोलापुर जनता बैंक व्याख्यानमाले मध्ये पुस्तक संग्रही ठेवण्याचा आग्रह केला होता.अशा प्रकारे पद्धतशिरपणे पुस्तकाला लोकमान्यता मिळवून देण्याचा इथल्या ब्राह्मणवाद्याचा डाव होता.पण आम्हाला माहित होते.भांडारकर या संस्थेशी संबंधित बारा भटानीच जेम्स लेनला ही सर्व विकृत माहिती पुरवली आहे.म्हणून या सर्वाचे तोंड उघडण्यासाठी आम्हला भांडारकरचे नाक ठेचावे लागले.विशेष म्हणजे भांडारकरवर कारवाई केल्या नंतर कोणीही मागे न हटन्याचे ठरले होते.त्या प्रमाणे आम्ही आमचे काम करुन पोलिसाची वाट पाहत बसलो होतो.अर्थात जय जिजाऊ ! जय शिवराय !! व भांडारकर तो झांकी है,शनिवारवाडा बाकि है !!!या घोषनानी सर्व पुणे दुमदुमून गेले होते.सर्वाना वाटत होते.आपल्याला लगेच सोडतील.पण मला एकच माहित होते की आपण  ब्राह्मणवाद्याच्या सांस्कृतिच्या चिंधडया उड़वल्या आहेत.आपली सुटका आता लवकर नाही. 
                         सर्वप्रथम आम्हाला डेक्कन जिमखाना पोलिस चौकीत टेंपो,पोलिस व्ह्यन इ.मधून नेहन्यत आले.त्या नंतर तेथील मुख्य साहेबांनी आमच्यातील प्रमुख कार्यकर्त्याना बोलवून आमच्या  कडून माहिती घेतली.आम्हाला चहा पाजुन आमची रवानगी फरासखाना पोलिस चौकिला केली.फरासखाण्यात सर्वाना एका कमी उजेडाच्या मोठ्या लोकअप मध्ये कोबण्यात आले.प्रत्येक अधिकारी येऊन दमबाजी करू लागला.पण 'जो बामन से नही डरे,क्या वो पोलिस से डरेगे ?'तर नाही. पोलिसाच्या दमबाजिला चेष्टा मस्करीतुन उत्तरं देण्याचा रमेश कदमने सपाटा लावला.रात्र केव्हा झाली कलेच नाही.अत्यंत अस्वच्छ व कुबट वासाच्या त्या कोठडीत धड नीट झोपताही येत नव्हते.त्याच वेळेस जेलचे जेवन आले.जेवण घेउन येनार्याला सर्वजन मामा म्हणत होते.आणि मामा बनवत ही होते.पहिल्या दिवशी जेवणाचा पहिला घास खाल्ला आणि मळमलायला लागले.तेव्हा कळले लोक जेलला का भितात ?पोलिसाच्या मारहानिला नव्हे तर बेचव जेवनाला लोक भितात.जे जेवन जनावरे सुद्धा खाणार नाहीत.असे अन्न खाण्याची पाली आली.तेव्हाच घरच्या जेवणाची पात्रता समजली.दुसर्या दिवशी सकाळी आंघोलीसाठी बाथरूम मध्ये गेलो तर संडास व बाथरूम दोन्ही एकच.आणि फरासखाण्याचे संडास म्हणजे शनीशिगनापुरची घरे...!'निर्ल्ल्जम सदा सुखी' म्हणतात त्याप्रमाणे  दिनक्रम सुरु झाला.तोपर्यत पेपर वाचावयास मिळाला.तसे आरोपी लोकाना पेपर वाचण्यास देत नाहीत.पण आम्ही सर्वजन राजआरोपी.अकरा वाजता आम्हाला कोर्टात नेले.व संध्याकाली परत फरासखाण्यात आणले.परत तेच बेचव जेवण आणि तोच मामा.रात्री उशिरा काही पोलिस आले.व मला आणि इतर तिघांना घेउन डेक्कन पोलिस स्टेशनला आले.रात्री उशिरापर्यत आमचा चौघाचा जबाब नोंदवन्याचे आला.शेवटचा प्रश्न असायचा.कशासाठी केले हे सर्व ?आमचे सर्वांचे समान उत्तर होते.जिजाऊंच्या बदनामिचा बदला घेण्यासाठी व पुढील काळात बहुजन समाजाच्या माता-भगिनिच्या अब्रू रक्षणासाठी  ! पण पोलिसाना हवी असलेली माहिती कदाचित मिलत नव्हती.म्हणून ते दमबाजीची भाषा वापरत होते.पण आम्ही जरा सुद्धा विचलित झालो नाही.शेवटी आमच्यासाठी राईसप्लेट मागवल्या.वरुण पोलिसाच्या शिव्या खात आम्ही राईसप्लेटचा फडशा पडला.
                          त्यानंतर आम्हा चौघाना पोलिसनी फरासखाण्याला न नेहता खडकिला नेहले.खडकिचे पोलिस  स्टेशन म्हणजे ओसाड गावची पाटीलकी !चहाचा गाडा एक किमी अंतरावर होता.पण फरासखाण्यापेक्षा इथली कोठडी लहान होती.आणि आमच्या आधी तिनजन पाहुने होते. खाली अंतरायला सतरणजीच्या मळकट कळकट पट्ट्या व पंघरायला ढेकुनयुक्त वाकळ !मग काय मज्जाच मजा !रात्री झोप लागेना म्हणून त्या तिन मुस्लिम आरोपीना बहुजन चळवळीचे  महत्व पटवून देत बसलो.थोडक्यात केडर केम्प घेतला. पोलिस सुद्धा मन लावुन आमच्या गप्पा ऐकत होते.दुसर्या दिवशी पुन्हा तोच मामा आणि त्याचे तेच जेवण.रात्री परत एका जगताप नावाच्या आरोपीला आमच्या कोठडीत कोडले.तोपर्यत पहिल्या तिघाना सोडून दिले होते.मग या भाईशी चर्चा चालू झाली.आम्ही भांडारकर तुडवलं हे ऐकल्यावर त्याला आनंद झाला.हा पहिला माणुस आम्हाला शुभेच्छा देणारा भेटला होता.एका तासात त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले.पण त्या माणसाने मात्र आमच्यासाठी पेस्ट व साबन पाठवून दिले.मग बर्याच दिवसानी आंघोळ केली.अंग मोकले झाले.मग मामाचे जेवण चवदार लागु लागले.एक एक दिवस पुढे सरकत होता.समोरच्या भिंतीवरचा जंगली महाराजाचा फोटो आम्हाला कार्टून वाटत होता.रोज आरोपी बदलत होते.त्या आरोपीचे जेवण जेवन्यास आम्ही सर्वजन त्यांना मद्दत करत होतो.पुन्हा एक दिवस पोलिस आले.व आम्हाला कोर्टात घेवुन गेले.आणि आता आमची सर्वाची रवानगी येरवडा कराग्रहात करण्यात आली.
                         ऐतिहासिक पार्श्वभूमि लाभलेल्या येरवडा काराग्रहा समोर आमची गाड़ी थाबली.त्या गाडीच्या जालीतुन बाहेर पाहिले तर आमचे सर्वाचे मित्र भेटण्यासाठी आली होते.थोड्या वेळाने एका एकाची तपासणी करुन आतमध्ये सोडण्यात आले.आतमध्ये गेल्या गेल्या एक झोपण्यासाठी पट्टी व दोन पांढर्या सूती घोंगडयासह एक जर्मनचा मग,एक मोठी वाटी देण्यात आली.व आमची सर्वाची म्हणजे ७२ जनाची रवानगी किशोर विभागात करण्यात आली.आमच्या आधी त्या हॉलमध्ये १०० ते १२५ कैदी होते. भिंतीच्या एका बाजूला लागुन आम्हाला जागा करुन देण्यात आली.सर्वजन एकत्र आल्यामुले काहीजनावरचा ताण मोकला झाला व गप्पा मारन्यास जोर चढला होता.रात्री सर्वाना रांगेत बसवून तिथल्या जुन्या कैद्यांनी आम्हाला जेवण वाढले. दोन जाडजूड चपात्या,आमटी व थोडासा भात.सर्वानी जेवनावर ताव मारला.कारण पोलिस कस्टडीपेक्षा येरवडयाचे जेवण बरे होते.सोबतीला इतर कैदयां कडून तिखट मिट मिळत होते.रात्री अंताक्षरी सुरु झाली तेव्हा एका कैदयांने जेवणाच्या थाल्या उलट्या टाकुन,'पिवळ्या साडीला हिरवी किनार ग,आज बायांचा आहे मंगलवार ग' ही बहुतेक स्वरचित लावणी म्हटली.मग रमेश कदम त्यावर छानपैकि नाचला.येरवडयातला पहिला दिवस केव्हा संपला समजलेच नाही.बाकीचे कैदी सकाळी सहा वाजता शेती कामासाठी जात होते.व संध्याकाली माघारी येत होते.माघारी आले की पुन्हा तेच नाच-गाने चाले.पण रात्री फक्त दहा वाजेपर्यतच.रोज सकाळी सहा वाजता गिनती म्हणजे मोजणी होत होती. रोज संख्या कमी-कमी होत होती.पण तरीसुध्दा बरीच गर्दी होती.येरवडयात मला रोज कोण ना कोण भेटायला येत होते.कधी पप्पा,तर कधी दादा,रणजीत तर कधी सर्व पंढरपूरातिल मित्र मंडली आणि एक दिवस स्वतः खेडेकरसाहेब भेटायला आले.एक दोन वाक्य बोलुन लगेच निघून गेले.गंगाधर बनबरेसरानी पुस्तके दिली.पण आत मिळालीच नाहीत.एके दिवशी तर लंडनवरून बी.बी.सी ची एक पत्रकार तरुणी मुलाखत घेण्यासाठी आली.पण आम्ही मुलाखत दिली नाही.रोज रात्री बसून आम्ही झोपण्यापूर्वी 'शिव नमो आधी नमन करुया जिजाऊ मातेला'हे आम्हीच रचलेले गीत एकत्र सुरात म्हणत असू.या गीतामुले इतर कैदी सुद्धा प्रभावित झाले.एका माघुन एक दिवस जात असताना पंढरपूरातिल अशोक डोंबे,धोडया, शेवत्याचा एक कैदी,शेगावचा भाकरे कैदी त्याच बरोबर धूला कोलेकर रोजच भेटण्यास येत होते.त्यांच्या मुले वेळ जात होता.मग कधी संपूर्ण येरवडयाचा परिसर फिरने,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गांधीजीच्यात झालेल्या पुणे कराराचे कोठडी पह्न्यास जाणे इत्यादी उद्योग सुरु होते.त्याच दरम्यान आमचा जमीन झामिन झाल्याची बातमी आली.सर्वजन नाचू लागले.पण इतर सर्व कैदयांचे चेहरे मात्र पडले.कारण रोज दोन पार्ट्या करुन चालणारी अंताक्षरी आता बंद पडणार होती.शेवटच्या दिवसामध्ये मी सर्वाचा केडर केम्प घेतला होता.त्या मुले सर्वच कैदी प्रभावित झाले व शनिवारवाडा आता आम्हीच बाहेर आल्यावर पडतो म्हणाले,त्याच्या या वाक्याने जग जिकल्याचे समाधान मिळाले.काहिजनानी आमचे पत्ते लिहून घेतले.अशोक दादा  डोंबेनी सर्वाना काय पाहिजे,काय नको.ते पाहिले.शेवटी एकदाचा जमीन झाला.व आम्ही येरवडयातुन भलीमोठी अनुभवाची शिदोरी घेउन बाहेर पडलो.बाहेर पडताना एकच निर्धार झाला,तो म्हणजे -चला एकच शिवनिर्धार करू ! भट मुक्त राष्ट्र निर्माण करू !!
                                                        जय जिजाऊ ! जय शिवराय !! 
*सदर लेख संक्षिप्त स्वरूपात आहे.भांडारकर प्रकरणाची केस पुणे कोर्टात चालू आहे.केस संपल्यावर "एका आंतरराष्ट्रिय षड्यंत्रचा पर्दाफाश:''आम्ही तुडवलं भांडारकर'' हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

Wednesday, January 5, 2011

गांधीहत्येमागचा मास्टरमाइंड ? 27 May 2008, महारास्ट्र टाइम्स



मणिशंकर अय्यर यांनी उकरून काढलेल्या वादानिमित्त महात्मा गांधींच्या हत्येतील सहभागाविषयी बरीच वादावादी झाली होती. तेव्हा ‘ आऊटलूक ’ ने केलेली ‘ वीर सावरकरः द इनसाइड स्टोरी ’ ही कव्हरस्टोरी खूप गाजली होती. ज्येष्ठ पत्रकार राजेश रामचंद्रन यांनी नॅशनल अर्काइवजमधील रेकॉर्डसच्या आधारे घेतलेला हा शोध आम्ही मराठीत देत आहोत.

यशस्वी होऊन या...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या करणारा नथुराम गोडसे आणि या कटातील त्याचा साथीदार नारायण दत्तात्रय आपटे यांना मिळालेला हा आशीर्वाद.. !

आणि हा आशीर्वाद दिला होता दस्तुरखुद्द विनायक दामोदर सावरकर यांनी...             

दिल्लीच्या संसद भवनापासून जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर ‘ नॅशनल अर्काइवज् ऑफ इंडिया ’ ची नव्याने बांधलेली इमारत आहे. या वास्तूत अनेक गाजलेल्या खटल्यांशी संबंधित जुनीपुराणी कागदपत्रे जतन करुन ठेवण्यात आली आहेत. त्यातच गांधी खून खटल्याशी संबंधित कागदपत्रेही उपलब्ध आहेत. पोलिसांनी नोंदविलेले जाबजबाब , साक्षीदारांच्या साक्षी आणि स्पेशल ब्रँचचे गोपनीय अहवाल असा सगळा दस्तावेज याठिकाणी आहे. त्यांची छाननी केल्यानंतर एक गोष्ट अगदी स्वच्छ आणि स्पष्ट दिसते ती म्हणजे गांधीजींच्या हत्येच्या कटात सावरकर यांचा असलेला सहभाग. महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे ते केवळ निकटवर्तीय नव्हते , तर या हत्या कटात त्यांचा उघड सहभाग होता , असं या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. ३० जानेवारी १९४८ साली गांधीजींची हत्या झाल्यानंतर ज्या आठ आरोपींवर खटला चालला त्यापैकी सावरकरही एक होते.

या ऐतिहासिक दस्तावेजांची पडताळणी केल्यानंतर जी माहिती मिळते ती अशी....

गोडसेचे गुरू : गांधी हत्या प्रकरणी विशेष न्यायालयात जी सुनावणी झाली , त्यामध्ये नथुराम गोडसे याने २८ फेब्रुवारी १९३८ रोजी सावरकरांना लिहिलेले पत्र पुराव्यासाठी सादर करण्यात आले होते. गांधीजींची हत्या करणारा गोडसे अनेक वर्षांपासून सावरकरांना ओळखत होता , हे त्यावरुन स्पष्ट होते. हिंदूराष्ट्राची उभारणी या समान विचारसरणीचा ध्यास घेतलेले सावरकर आणि गोडसे यांचे संबंध गुरू-शिष्य असे होते.                                                                   
सावरकर हिंदूमहासभेचे अध्यक्ष झाल्यानंतर गोडसेने त्यांना हे सविस्तर पत्र पाठवले होते. त्या पत्राचा आशय असा होता - “ रत्नागिरीतून तुमची सुटका झाल्यापासून सर्वांच्या मनात धगधगते अग्नीकुंड पेटले आहे. हिंदुस्थान हे केवळ हिंदूंसाठीच असावे , अशी मनापासून इच्छा बाळगणा-यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे. हिंदूमहासभेचे अध्यक्षपद स्वीकारताना आपण जे भाषण केले , ते ऐकल्यानंतर आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणे फारसे अवघड राहिलेले नाही , याची खात्री पटते. ” आपण एक राष्ट्रीय स्वयंसेवक आर्मी स्थापन केली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५० हजार कार्यकर्ते त्यासाठी सज्ज आहेत , असा उल्लेखही त्या पत्रात आहे. हिंदूंच्या हितरक्षणासाठी लढणारांना सावरकरांनी मार्गदर्शन केले पाहिजे , अशी गोडसेची इच्छा होती.                

तत्कालिन बॉम्बे प्रांताच्या स्पेशल ब्रँचचे पोलिस उपायुक्त जमशेद नगरवाला यांनी गांधी हत्या कटाचा तपास केला होता. आपल्या अहवालात नगरवाला म्हणतात की , “ सावरकरांची राजकीय विचारसरणी गोडसेने १९३५ सालापासूनच अंगिकारली होती. गोडसेने १९३० साली रत्नागिरीत रा. स्व. संघाची शाखा उघडली होती. ”

गोडसेंची सावरकरांवर एवढी भक्ती होती की , आपल्या वर्तमानपत्राच्या मास्टहेडमध्ये (शीर्षस्थानी) त्याने सावरकरांचा फोटो छापला होता. हिंदूराष्ट्र प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणा-या अग्रणी नावाच्या वृत्तपत्राचा गोडसे संपादक , तर सह आरोपी नारायण आपटे हा मॅनेजर होता. सावरकरांनी दिलेल्या १५ हजार रुपयांच्या भांडवलावरच हे वृत्तपत्र सुरु करण्यात आले होते.        

सावरकरांचा सहकारी गोडसे : गोडसेने सावरकरांसोबत बराच काळ एकत्र काम केले होते. १९४६ साली त्याने सावरकरांना लिहिलेल्या पत्रावरून त्यांचे हे संबंध स्पष्ट होतात. दिल्लीचे शेठ जुगल किशोर बिर्ला यांच्याकडून सावरकरांना एक हजार रुपयांचा चेक मिळाला. तो चेक सावरकरांनी गोडसेला दिला. या व्यवहाराची माहिती त्या पत्रात नमूद करण्यात आली आहे.

पोलिस रेकॉर्डनुसार , गोडसे आणि आपटे सावरकरांचे एवढे जवळचे होते की , अनेकदा ते दोघे त्यांच्यासोबत प्रवास करत. गांधी हत्येच्या पाच महिने आधी , ऑगस्ट १९४७ मध्ये त्यांनी सावरकरांसोबत शेवटचा प्रवास केला होता. गांधी हत्येच्या कटात आपला हात असल्याचा सावरकरांनी निक्षून इन्कार केला असला तरी , ते गोडसेचा नेहमीच आदरार्थी उल्लेख करीत राहिले. त्यांनी पोलिसांना ज्या जबान्या दिल्या आणि कोर्टात सुनावणीच्या वेळी साक्षी दिल्या तेव्हा गोडसेचा उल्लेख पंडित नथुराम असा आदराने केला.
गांधी हत्या कटाची माहिती सावरकरांना होती : डीसीपी नगरवाला यांच्या क्राइम रिपोर्टमध्ये बॉम्बे प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख आहे. महात्मा गांधींवर २० जानेवारीला झालेल्या पहिल्या हल्ल्याची तपशीलवार माहिती देसाई यांनी नगरवालांना दिली होती. ‘ मला गृहमंत्र्यांनी अशी माहिती दिली की , महात्मा गांधींवर २० जानेवारी १९४८ रोजी जो प्राणघातक हल्ला झाला. त्यामध्ये मदनलाल , त्याचा सहकारी करकरे आणि इतरांचा हात होता. दिल्लीत गांधीजींवर हल्ला करण्यापूर्वी मदनलाल आणि करकरे यांनी सावरकरांची भेट घेतली होती ’, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली , असा उल्लेख नगरवालांच्या अहवालात आहे.

             
              सावरकरांना गांधी हत्या कटाची संपूर्ण माहिती होती , अशी माहिती नगरवालांना मिळाली होती. आपल्या रिपोर्टमध्ये ते नमूद करतात - ‘ सावरकरांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गांधी हत्येचा कट आखण्यात आला होता , अशी माहिती माझ्या सूत्रांनी मला दिली. मी आजारी आहे आणि राजकारणाशी माझा संबंध उरलेला नाही , असा सावरकरांनी घेतलेला पवित्रा ढोंग आहे.... त्यामुळेच सावरकरांच्या राहत्या घरावर वॉच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ’

गांधी हत्येचा कट आखणा-यांमध्ये सावरकरांच्या विचारसरणीला मानणा-यांचा तसेच नाराज शीख विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे नगरवाला यांनी अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदू राष्ट्र दल या संघटनेचे लोक सावरकरांना मानणारे आहेत. त्यांची आणि नाराज शीख कार्यकर्त्यांची एक गुप्त बैठकही झाली होती. स्वतः सावरकर यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीत गोडसे , आपटे आणि इतर गांधी हत्या कटातील आरोपी हिंदू राष्ट्र दलाचे कार्यकर्ते होते , अशी कबुली दिली होती.

गांधी हत्या कटात सावरकरांची भूमिका : महात्मा गांधींवर २० जानेवारी रोजी मदनलाल पाहवा नावाच्या पंजाबी निर्वासिताने पहिला प्राणघातक हल्ला केला. नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधींच्या प्रार्थनेनंतर त्याने स्फोट घडवला. त्याला तत्काळ अटक करण्यात आली. मदनलालला ओळखणारे मुंबईच्या रुईया कॉलेजचे डॉ. जगदीश चंद्र जैन यांनी दुस-याच दिवशी सायंकाळी ४ वाजता बॉम्बे प्रांताचे तत्कालीन पंतप्रधान बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. खेर यांनी गृहमंत्री मोरारजी देसाई यांनाही बोलावून घेतले. ‘ मी त्यांच्या रुममध्ये गेलो. माननीय पंतप्रधानांनी डॉ. जैन नावाच्या व्यक्तीशी माझी ओळख करुन दिली. वृत्तपत्रामध्ये त्या व्यक्तीने स्फोटाची बातमी वाचली , तो स्फोट घडविणा-या मदनलाल नावाच्या माणसालाही आपण ओळखतो , मला त्या व्यक्तीची चांगली माहिती आहे आणि ती द्यायची आहे , असे डॉ. जैन यांनी सांगितले... ’ असे मोरारजींच्या जबानीत नमूद करण्यात आले आहे.                                                       
                                                                                                          
मोरारजींच्या जबानीनुसार , जैन यांना त्या कटाची संपूर्ण माहिती होती. ‘ मदनलाल आणि त्याच्या काही मित्रांनी जैन यांना सांगितले होते की , ते एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करणार आहेत. तो नेता म्हणजे महात्मा गांधी असल्याचे मदनलालने जैन यांना सांगितले होते... अहमदनगरला त्याच्यासोबत काम करणा-या करकरे नावाच्या मित्राची मदनलालने ओळख करुन दिली.... मदनलालने पुढे सांगितले की , करकरे त्याला घेऊन सावरकरांना भेटायला गेला होता. जवळपास दोन तासांहून अधिक काळ त्यांच्यात चर्चा झाली. मदनलाल जे काही करत आहेत , त्याबद्दल सावरकरांनी त्याला शाबासकीही दिली. त्यांनी मदनलालची पाठ थोपटली आणि मोहिम फत्ते करा , असे सांगितले. ’
बडगेंची महत्त्वपूर्ण जबानी : नगरवालांनी या प्रकरणाचा तपास करताना दिगंबर रामचंद्र बडगे नावाच्या माणसाला अटक केली. या बडगेनेच गोडसेला स्फोटके दिली होती. गोडसेने ती मदनलालला दिली. नंतर बडगे माफीचा साक्षीदार बनला आणि सरकारी पक्षाचा मुख्य साक्षीदार झाला. गांधी हत्या कटात सावरकरांचा कसा सहभाग होता , याची धक्कादायक वस्तुस्थिती बडगेने कोर्टात साक्ष देताना सांगितली.
                                                                                                    
बडगे हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता. छोट्या शस्त्रांचा तो व्यापार करत असे. ९ जानेवारी रोजी आपटे आणि मदनलाल त्याच्याकडे गेले आणि त्यांनी गट कॉटन स्लॅबची (स्फोटक) मागणी बडगेकडे केली. दुस-या दिवशी आपटे बडगेला घेऊन दलाच्या कार्यालयात गोडसेला भेटायला गेला. दोन गन कॉटन स्लॅबस् , पाच हातबॉम्ब आणि दोन रिवॉल्वर्सची ऑर्डर बडगेला देण्यात आली. त्यासाठी पाहिजे ती किंमत देण्याचे आश्वासन गोडसेने दिले. मात्र ही शस्त्रसामुग्री बडगेने मुंबईत पोहोचती करायची , अशी अट घालण्यात आली. हिंदू महासभेच्या दादरच्या ऑफिसमध्ये आपटेला १४ जानेवारीला ती डिलिवरी हवी होती. बडगेने हत्येमागचा हेतूही पोलिसांना सांगितला. ‘ आपटेने मला विचारले की , आमच्यासोबत दिल्लीला यायची तुझी तयारी आहे का ? मी कशासाठी , अशी विचारणा केली. तेव्हा आपटे म्हणाला की , ‘ तात्याराव ’ म्हणजे सावरकरांनी गांधीजी आणि जवाहरलाल नेहरु यांना संपविण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे काम त्यांनी माझ्याकडे सोपविले आहे. ’

बडगे १७ जानेवारीला पुन्हा सावरकर सदनात गेला. ‘ तेव्हा गोडसे म्हणाला की , आपण सगळ्यांनी बाहेर पडण्यापूर्वी तात्यारावांचे शेवटचे दर्शन घेतले पाहिजे. आपटे , गोडसे , शंकर आणि मी टॅक्सीत बसलो आणि शिवाजी पार्कला सावरकर सदनाच्या दिशेने निघालो. मुख्य जंक्शनवरच टॅक्सी थांबवण्यात आली. आम्ही चौघे खाली उतरलो आणि समोरच्या बोळातून चालत सावरकर सदनात जाऊन पोहोचलो. जंक्शनपासून ती दुसरी बिल्डिंग होती. मला खालीच थांबायला सांगण्यात आले. आप्पा कासार आणि दामले तिथे होते. आपटे आणि गोडसे सावरकरांच्या दर्शनासाठी वर गेले. पाच किंवा दहा मिनिटांनी ते खाली उतरले. सावरकरही त्यांच्यापाठोपाठ खाली आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. यशस्वी होऊन या... ’

सावरकर सदनातून परतताना आपटे बडगेला म्हणाला , ‘ गांधीजींची शंभरी भरली आहे , असे तात्यारावांचे भाकित आहे. ’ आपटेचे हे वाक्य आणि सावरकरांचे माझ्या कानांनी ऐकलेले आशीर्वाद यावरुन माझी खात्री पटली की , जे काही घडले त्याला तात्यारावांची मान्यता होती आणि त्यांचा त्यास आशीर्वादही होता. ’ गोडसे आणि आपटे दिल्लीला गेले. बडगे आणि शंकर दिल्लीला १९ जानेवारीला जाऊन पोहोचले. त्याठिकाणी हिंदू महासभेच्या कार्यालयात गोपाळ गोडसे , करकरे आणि मदनलाल यांना भेटलो.

गन कॉटन स्लॅब पेटवायचा , त्यातून गोंधळाची स्थिती निर्माण करायची आणि नंतर हातबॉम्ब फेकायचे , असा कट आखण्यात आला होता. मदनलालने स्फोटके पेटवली , परंतु बडगे आणि त्याच्यासोबत असलेल्या शंकरला हातबॉम्ब फेकता आले नाहीत. त्यामुळे हा कट फसला. खरं तर अनोळखी व्यक्तींच्या हातून हे काम करुन घेण्याचा आपटे आणि गोडसेचा खरा हेतू होता. मात्र तो फसल्याने शेवटी आपटे आणि गोडसेलाच हे काम स्वतः उरकावे लागले.

सावरकरांची निर्दोष मुक्तता का झाली ? : न्यायमूर्ती आत्मा चरण यांच्या कोर्टात जो खटला चालला , त्यात सर्व आठ आरोपींवर पहिला आरोप होता तो त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचल्याचा. उल्लेखनीय बाब म्हणजे , सावरकरांचा अपवाद वगळता अन्य सर्व आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले. तर बडगेने दिलेले साक्षीपुरावे तपासून घेण्यासाठी अन्य कोणताही पुरावा नसल्याच्या तांत्रिक मुद्यावरुन सावरकरांची मात्र कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

तरीही , बडगे हा विश्वासू साक्षीदार असल्याचे कोर्टाचे मत होते. २० जुलै ते ३० जुलै १९४८ असे जवळपास दहा दिवस त्याची साक्ष आणि उलट तपासणी कोर्टात झाली. “ बडगेने त्याला असलेली सगळी माहिती परखडपणे कोर्टात सांगितली. उलट तपासणीतही त्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली , कोणत्याही प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला नाही. ” परंतु तरीही न्या. आत्मा चरण यांनी सावरकरांना दोषी ठरवले नाही. कारण सरकारी बाजूने सर्व भिस्त बडगेच्या साक्षी पुराव्यावरच बेतलेली होती.

गांधी हत्या कटातील दोन्ही प्रमुख आरोपी सावरकर सदनात गेले होते , हे तर जगजाहीरच होते. तत्कालिन ख्यातनाम अभिनेत्री शांताबाई मोडक यांनीही साक्ष देताना , गोडसे आणि आपटे आपणाला पुणे एक्स्प्रेसमध्ये भेटले. १४ जानेवारीला त्यांना मी सावरकर सदनाजवळ सोडले , अशी माहिती दिली. १७ जानेवारीला आपटे आणि गोडसे शिवाजी पार्कला सावरकर सदनाजवळ माझ्या टॅक्सीतून उतरले , अशी साक्ष टॅक्सीचालक ऐतप्पा कोटियन यानेही दिली.

“ सावरकरांची गांधी हत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्याच्या कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाला सरकारी पक्षाने हायकोर्टात आव्हान दिले नाही. त्यामुळे हायकोर्टात हे प्रकरण कधीच रिओपन झाले नाही ,” असे मत शिमला हायकोर्टाचे न्या. जी. डी. खोसला यांनी व्यक्त केले आहे. खोसला यांनी साक्षीदार बडगेचे कौतुक केले. “ बडगेने त्याच्याकडे असलेली संपूर्ण माहिती तपशीलवार कोर्टात सांगितली. माझे असे मत आहे की , त्याने सांगितलेली सगळी माहिती सकृतदर्शनी खरी वाटते ,” अशी पुस्तीही न्या. खोसला यांनी जोडली.

कपूर आयोगाचा निष्कर्ष : गांधी हत्येनंतर तब्बल वीस वर्षानंतर न्या. जीवन लाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली गांधी हत्येच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्यात आला. बडगेने दिलेली साक्ष ही सावरकरांचे अंगरक्षक आप्पा रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या जबानीशी सुसंगत आहे , असे मत न्या. कपूर आयोगाने नोंदविले. परंतु न्या. कपूर आयोगाचा निष्कर्ष असा होता की , “ सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मिळालेली माहिती तुटक तुटक अवस्थेत आहे. सावरकर आणि त्यांच्या ग्रुपने हत्येचा कट आखल्याचे त्यावरुन स्पष्ट होत नाही. ”

(अनुवाद - आऊटलुक , ६ सप्टेंबर २००४ मधील लेखाचा)


Monday, January 3, 2011

'सांस्कृतिक दहशतवाद मुक्ति दिन'

आज 'सांस्कृतिक दहशतवाद मुक्ति दिन' याच दिवसी आम्ही राजमाता जिजाऊ च्या अपमानाचा बद्दला भांडारकर वर लहानशी कारवाई करुन घेतला.त्या बद्दल आम्हाला ब्राम्हनानि दहशतवादी,तालिबानी ठरवले.आज एकच सांगू इच्छितो,आईच्या अपमानाचा बद्दला घेण्यासाठी आम्हाला एकदा नव्हे तर लाख वेळा दहशतवादी,तालिबानी संबोधले गेले तरी आम्हाला ते मान्य आहे.चला एकच शिव निर्धार करू ! भट मुक्त राष्ट्र निर्माण करू !!
जय जिजाऊ ! जय शिवराय !!