Wednesday, August 16, 2023

आणि शरद पोंक्षे....पाय लावून पळाला !!!

काही वर्षापुर्वी संभाजी ब्रिगेडच्या वाघांनी विकृत नाटक "हे राम नथुराम" औरंगाबादमध्ये बंद पाडले.काही दिवस आगोदर याच नाटकाला सांगली,कोल्हापूरमध्ये ही संभाजी ब्रिगेडने हिसका दाखवला होता.त्यावेळेस मी खालील पोस्ट फेसबुकवर लिहली होती.आणि शरद पोंक्षेंना पाठवली होती.त्यावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला मी जोरदार प्रतिवाद केला आणि चर्चेची भाषा करणारे पोंक्षे चक्क चर्चेतून मला ब्लाॅक करुन पळून गेले...

झी फेसबुक पोस्ट.

हे राम...!!! न...थू....थू....राम !!!कृत शरद पोंक्षेने एक त्रिकालबाधित सत्य समजून घेतले पाहीजे.ते म्हणजे...नथुराम काय ? आणि संघ परिवार काय किंवा स्वत: पोंक्षे काय ? हे हरलेली लढाई लढत आहेत.....महात्मा गांधीजींचा खून करुन हि गांधी संपत नाही.हेच या लोकांचे मुळ दुखने आहे.गांधी म्हणजे या विकृत लोकांसाठी अवघड जागचं दुखणं होऊन बसले आहे.जे उघड सांगता ही येत नाही अन् दाखवता ही येत नाही.यांचा गांधींना विरोध पण लोकशाहीत लोक लाजस्तव नथु ला खुद्द संघाला गो.मा.वैद्यांच्या तोंडी खुनी जाहीर करावं लागतयं !  पुर्ण बहुमताच्या जोरावर नोटा बदल्या पण नोटेवरील गांधी बदलू शकले नाहीत.पोंक्षे किती ही विकृतपणे गांधी विरोध करित राहीला तरी नाटकाच्या तिकीट विक्रीतून पोंक्षेच्या घरात शेवटी गांधीच पोहचतात !!! गोळवलकर गुरुजी नाही.पोंक्षे...इस गांधीसे पिछा कैसे छुडावोगे ? अरे....न...थू वाद्यांनो....!!! तुम्ही गांधीजी ना किती वेळा मारले तरी गांधीजी अमर आहेत...कारण,गांधी एक सत्य आहे.गांधी एक विचार आहे.गांधी एक जीवन प्रणाली आहे.जेव्हा नथूने गांधीजींचा खून केला...तेव्हा गाडगेबाबांना किर्तनात ही बातमी समजताच गाडगेबाबा म्हणाले होते,...."अरे...!!! मरते है हम और तुम.गांधीजी को तो मरनच नही ।" हे सत्य समजून घ्या आणि असत्याचे फसलेले प्रयोग बंद करा.नाही तर लोक तुमचे एक दिवस "हे राम....करतील अन् नथू कायम छि थू च्या लायकीचा होता.त्यावर थू करणे ही लोक आपल्या थू चा अपमान समजतील.

हे राम...!!! न...थू...थू....राम !!!!

फेसबुक मॅसेजर मध्ये झालेला माझा व शरद पोंक्षेंचा वादविवाद

शरद पोंक्षे :- हरलेली लढाई नसते.लढाईत हरतो किंवा जिंकतो.मी लढाई लढतोय. हरण्याची भितीने लढाई सोडून जाणारा मी नाही. त्यामुळे हरलो तरी बेहत्तर.पण जे सत्य सरकारने दडपलय ते फक्त समोर आणण्याचा माझं नाटक हा प्रयत्न आहे. ते मी १९९८ पासुन सतत २०१६ पर्यंत करतोय  व करत राहणार.या गेल्या १८ वर्षात एकही प्रयोग मी घाबरून रद्द केला नाही.करणार नाही. अहिंसेच्या पुजार्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.पेट्रोल बाॅम्ब टाकून गाडी पेटवली.चालू नाटकात घुसून १५० लोकांनी मला एकट्याला घेतला.माझा सेट तोडला.पण मी प्रयोग पुर्ण केला.मला तुम्ही गांधीजींच्या जयजयकार करत ठारही मारू शकता.मी निशस्त्र असतो.केव्हाही मला मारू शकता.प्रयत्न ही करूनझालेत.तेव्हा  शांतपणे बोलू  शकत असाल तर अवश्य भेटा.आपण बोलुयात.आणि हो गेल्या १८ वर्षात  माझ्यावर एकाही रसिकाने थू थू केलेली नाही. उलट माझ्या  पाया पडतात.माझ्या कामाचं कौतूक करतात.खरंच देशभक असाल तर नाटकाला या भेटा आपण बोलुयात.मला एकेरीत शिव्या दिल्यात.नो प्रॉब्लेम. तूम्हाला शुभेच्छा

मी :- सध्या दोन्हीकडे सरकार गांधीजींच्या मारेकर्‍यांचेच आहे.सरकारने दडपलेले सत्य त्यांनाच जाहीर करण्यास सांगा.एखाद्या मन की बात मधून किंवा क्लिन चीट प्रेसनोट मधुन.आणि ठार मारण्याची भाषा आम्ही कशाला करु ? ती तर गोडसेवाद्यांची सनातन भाषा आहे.आम्ही गांधीवादी आहोत.गांधीजी,दाभोळकर,पानसरे,कलबुर्गीचे मारेकरे आणि या देशाचे खरे दुश्मन कोण आहेत हे आता सर्वांना माहिती होत आहेच.आणि हो ! शांत पणे बोलण्याचा सल्ला तुम्ही देणे म्हणजे जरा अतीच होतय.तुमच्या पाया पडणारे आणि गांधीजींना मारणारे,त्यांचा मृत्युनंतर ही द्वेष करणारे कोणत्या पेठेतील सनातनी पिलावळ आहे.हे सर्वांना माहिती आहे.आणि हो...ज्यांचे स्वातंञ्य मिळवण्यात काडीचे ही योगदान नाही.अशा सनातनी कोडग्यानी अन् संघीस्ट शेंबड्यांनी आम्हाला खूनी नथूच्या आडून  पोकळ देशभक्ती शिकवण्याचा आव आणु नये.शिव्या आणि सत्य यातील फरक समजत नसेल तर आमचा नाईलाज आहे.आणि असले बकवास नाटक पाहण्यापेक्षा मी गांधीजींचे सत्याचे प्रयोग परत वाचने पसंत करेन.तुम्हाला वैफल्यातून बाहेर पडण्यास तुमचा नथू तुम्हाला मद्दत करो...!!! बरं तेवढे नोटेवरील गांधीजींचा पिछा कसा सोडवणार तेवढे सांगितले तरी पुरे...बाकी चालू द्या नौटंकी.

जय हिंद...!!!

शरद पोंक्षे :- एकूणच  तूम्ही डोळ्यासमोर पट्टी बांधून घेतली आहे.. तुम्हाला ईतिहास समजूनच घ्यायची ईच्छा नाही. त्यामुळे तुमच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मी प्रयोग करीन.धन्यवाद

मी :- तुमच्याकडे सर्मपक उत्तरच नसल्यामुळे सावरकरवाद्यांसारखी पलायनवादी भूमिका घेत आहात.

शरद पोंक्षे :- सावरकर पळपुटे होते.हे जर तुमचे ज्ञान असेल तर तुमच्याशी न बोलेलेच बरे.झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला उठवू शकत नाही.

असे बोलून....पोंक्षे मला ब्लाॅक करुन पाय लावून पळून गेले !!!