"शिवधर्म गाथा" समजून घेताना.....! (भाग १ ला)

'शिवधर्म गाथेचे' प्रास्थाविक......
शिवधर्म संसद आपल्या प्रास्थाविका मध्ये अनेक बाबींचा उल्लेख करते.जसे कि 'शिवधर्मा'च्या समग्र मांडणीला येथून पुढे कायम "शिवधर्म गाथा" संबोधले जाईल.यामध्ये अत्यंत महत्वाचा उल्लेख म्हणजे 'आज जी मांडणी आपल्या पुढे ठेवली आहे.ती एक प्रकारे शिवधर्म गाथेचा कच्चा आराखडा आहे.' म्हणजे या मध्ये आपणा सर्वांना शिवधर्म संसद आपल्या विवेकबुद्धीचा वापर येत्या वर्षभरामध्ये व तेथून पुढे हि करण्याचे एक प्रकारचे आवाहनच करीत आहे.व त्यास अनुसरून आपण आपल्या सुचना पाठवण्याचे हि आवाहन करीत आहे.आणि हाच मुद्दा 'शिवधर्म' आणि जगातील इतर सर्वच 'धर्म' यातील फरक अत्यंत ठळकपणे अधोरेखित करणारा आहे.आणि तो म्हणजे,जगातील आजपर्यंतच्या (माझ्या अभ्यासा नुसार) कोणत्याही 'धर्मा'ने धर्म संबंधी बाबी ठरवण्याचा अधिकार आपल्या अनुयायांना दिलेला नव्हता.व नाही.पण 'शिवधर्म' मात्र हा जगातील असा एकमेव 'धर्म' आहे.जो आपल्या अनुयायांना आपला 'विवेक' सतत वापरण्याची मुभा तर देतोच आहे.पण 'धर्म' तत्वज्ञान ठरवण्याचा 'अधिकार' हि देत आहे.आणि हीच गोष्ट 'शिवधर्म' या संकल्पनेला सर्व धर्माहून वेगळे दर्शवण्या बरोबर आपले वैशिष्ठ्य अधोरेखित करणारी आहे.जगदगुरु तुकोबारायांच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास.....
जो जागता आपुलिया हिता !
धन्य माता-पिता तयाचिये !!
असेच या संदर्भात म्हणता येईल.त्याच बरोबर फक्त 'धर्म' तत्वज्ञान काय असावे ? एवढेच सुचवण्याचा 'शिवधर्म संसद' आपणाला अधिकार देत नाही तर त्यात काळानुरूप 'बद्दल' करण्याचा लोकशाहीतील अतिउच्च असा असणारा 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा' अधिकार हि प्रदान करते आहे.यातून एक बाब अत्यंत ठळकपणे स्पष्ट होते कि,'माणूस हा धर्मासाठी आहे' हि परंपरागत विचारसरणी टाकून 'शिवधर्म संसद' 'धर्म हा माणसांसाठी आहे.' हे सांगते.शेवटी कुणीतरी म्हटले आहेच ना,"जो 'धारण' करतो तो 'धर्म' !" येथे आज पर्यंत आपण ज्या कोणत्याही धर्मात आहात,होता.त्या धर्माने आपल्याला कधी 'धारण' केले होते का ? केले आहे का ? याचा हि विचार प्रत्येकाने करावा.तसेच,आपल्याला आपल्या 'धर्म' बाबी ठरवण्याचा 'अधिकार' दिलेला होता का ? दिलेला आहे का ? व अत्यंत महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या 'धर्माने' त्याच्या तत्वज्ञानात 'बद्दल' करण्याचा कधी 'अधिकार' दिलेला होता का ? किंवा दिलेला आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्येकांने आप-आपल्या मेंदूला विचारल्या शिवाय 'शिवधर्माचे' वेगळेपण आणि वैशिष्ट्य लक्षात येणार नाही.
(क्रमश:)